Monday, March 24, 2008

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti


कविराज भूषण यांच्या शीवाजी महाराजन वरील कवीता....
सरवानी जरुर आइका
जय भवानी जय शीवाजी !!!!!!


Powered by eSnips.com

++ सेर सिवराज है ++

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||

पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |

ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |

भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||


-कविराज भूषण

{जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात}
___________________________


निश्चयाचा महामेरु | बहुत जनंसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||
नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती |
पुरंदाराणी शक्ति | पृष्ठाभागी ||

यशवंत किर्तिवंत | सामर्थ्यावंत वरदवंत |

पुण्यवंत नितीवंत | जाणता राजा ||

आचारशील विचारशील | दानशील धर्मशील |

सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठाई ||

धीर उदार गंभीर | शुर क्रियेसी तत्पर |

सावधपणे न्रुपवर | तुच्छ केले ||

देवधर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण |

ह्रुदयस्थ झाला | नारायण प्रेरणा केली ||

या भुमंडळाचे ठाई | धर्मरक्षी ऐसा नाही ||

महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||

कित्येका दुष्ट | संहारिला कित्येकासी धाक सुटला |

कित्येकास आश्रय जहाला| शिवकल्याणराजा ||


- समर्थ रामदास

___________________________


*** गर सिवाजी न होते तो ***

राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |

अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |

धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |

देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |

दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |

रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |

कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |

बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||

राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |

देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||

देवल गिराविते , फिराविते निसान अली |

ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||

गौर गणपती आप , औरनको देत ताप |

आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |

सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||

कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |

सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||


- कविराज भूषण.


{{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}

Thursday, March 20, 2008

होळी आली रे !!!!!!!!

होळी आली रे !!!!!!!!

तुम्हीच रंग तयार करा घरच्या घरी!

होळी ली रे !!!!!!!!

तुम्हीच रंग तयार करा घरच्या घरी!

फुले, फळे आणि पानांपासूनही घरच्याघरी रंग बनवता येतात व ते शरीराला घातकही नसतात. ….
हिरवा - मेंदी पावडर कोणत्याही पिठात मिसळा. सुंदर हिरवा रंग तयार होईल. अथवा पालक, गुलमोहर, पुदिना किंवा कोथिंबीर यांची पाने वाळवा (कागदात गुंडाळून ती फ्रीजमध्ये ठेवावीत) व त्याची पूड तयार करा.

पिवळा - दोन चमचे हळद पावडर आणि चार चमचे बेसन पीठ एकत्र करून पिवळा रंग तयार होऊ शकतो। अथवा बहावा, झेंडू, पिवळी शेवंती, काळी बाभूळ यातील कोणत्याही फुलाच्या पाकळ्या सावलीत वाळवून पूड करून त्यात बेसनाचे पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी बहावा किंवा झेंडू फुले पाण्यात घालून उकळा.

लाल - लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळवून पूड करा आणि त्यात कोणतेही पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी लाल डाळिंबाची साल पाण्यात उकळा. किंवा रक्तचंदनाची पावडर एक लिटर पाण्यात घालून उकळा.
किरमिजी - बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळा। हे मिश्रण उकळा अथवा रात्रभर तसेच ठेवा. अथवा दहा ते पंधरा गुलाबी रंगाच्या कांद्याची साले अर्ध्या लिटर पाण्यात उकळा.

केशरी - पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून किंवा उकळून सुगंधी केशरी रंग मिळतो। फुले वाळवून पूड केल्यास कोरडा रंग होतो.

काळा - वाळलेली आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवा. पाणी घालून रंग फिका करा आणि वापरा.अशा रंगाच्या सहाय्याने होळी साजरी करा।

http://majhablog.in/

Heart Attack ani Vithal..




Vacha Ani Anand Ghya.....वाचा आणी आनंद घ्या

वाचा आणी आनंद घ्या


हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?...
... अहो , आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
===================================================
* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
===================================================
* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा... तो स्वत : हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
===================================================
का ? का? का?
१ . पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल , तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
२ . स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक ' बसतात ' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३ . जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का ?
४ . बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का ? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?
===================================================
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला .
त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.
त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद
" जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;
तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .
त्याला हृदय नसतं ;
आणि
तिला डोके नसतं ...."

Friday, March 14, 2008

विनोदाचा "दादा"- पुण्यस्मरण....Dada Kondke


विनोदाचा "दादा...'

भारतीय चित्रपटसृष्टीला दोन दादांचे अफाट योगदान आहे. एका दादांनी अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म दिला. दादासाहेब फाळके त्यांचं नाव. दुसऱ्या दादांनी "थेटर'चा पडदा फाटेल, इतकं खळखळून हास्य चित्रपटसृष्टीला दिलं. दादा कोंडके त्यांचं नाव. चौदा मार्चला दादा कोंडके यांची दहावी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा. .......

काळाच्या पुढचा दिग्दर्शक
(विजय कोंडके)
"सोंगाड्या' पूर्ण होऊन त्याला वितरक मिळत नसतानाचा हा किस्सा आहे. या चित्रपटाच्या जवळपास ३०-३५ "ट्रायल्स' झाल्या; पण चित्रपट विकत घ्यायला कोणी पुढे येत नव्हतं. या चित्रपटातील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीवर अनेकांचा आक्षेप होता. ते या चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांना पाहत होते. .......


दादांचे चित्रपट "क्‍लासिक'!

(मकरंद अनासपुरे)
ज्या माणसानं आयुष्यात खूप जास्त दुःख भोगलंय, त्याला उत्तम विनोद करता येतो, असं म्हणतात. दादा कोंडकेंनी खूप भोगलं म्हणूनच त्यांचे सर्व चित्रपट एकापेक्षा एक असे सरस मनोरंजन करणारे ठरले. सामान्य माणसाला समजेल, उमजेल असा विनोद त्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे सादर केला. .....

दादा नावाचं वादळ...!
विनोदाने नेहमीच त्यांच्या पायाशी लोळण घेतली असा अवलिया. या "ज्युबिली किंग'च्या निधनाला पाहता पाहता १० वर्षे लोटली. आपल्या "विच्छा'शक्तीच्या जोरावर मराठी मनावत आगळे स्थान मिळविणाऱ्या दादांचे हास्यस्मरण २० मार्च रोजी करण्याचे "साम मराठी' वाहिनी, "सकाळ' आणि कै. दादा कोंडके प्रतिष्ठान यांनी करावयाचे ठरविले आहे. .......

विजय कोंडके दादांविषयी सांगतात...
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा

मकरंद अनासपुरे दादांविषयी सांगतात...
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा

दादांचे जीवनपट
स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

Kahi Nivdak...

Monday, March 10, 2008

कारण शेवटी मी एक... Kaaran Shevti Me Ek....

कारण शेवटी मी एक...

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअरप्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक ......

Friday, March 07, 2008

Team India....टिम इंडिया.



त्रिवार वंदन तुला महेंद्रा,
त्रिवार वंदन तुला.
तुझ्या संयमी नेतृत्वाला,
तुझ्या टिमच्या कतृत्वाला
त्रिवार वंदन विजयश्रीला. १
एकोपा-विश्वास गमक हे,
तुझ्या उत्तुंग यशाचे,
कांगारूंना खडे चारशी
नमवूनी त्यांच्या देशी. २
तिरंग्याची तू शान राखिशी
ऐतिहासिक हि नोंद जयाची,
जिंकूनी तू तर जिंकिलेस रे,
भारतीयांच्या मना.
आंम्हा भारतीयांच्या मना. ३


अलकाताई.

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु..

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...


--- अभिजित गलगलीकर ...

महाशिवरात्री ची कथा

महाशिवरात्री ची कथा


महाशिवरात्रीच्या दोन कथांपैकी एक कथा आपल्याला माहीत असल्याने त्याची पुनरुक्ती करीत नाही. ती कथा भारतीय साहित्यात मिथक झाली आहे. ती म्हणजे व्याधाची कथा. शिकारीच्या निमित्ताने आलेला व्याध तळ्याजवळच्या बेलाच्या झाडावर बसतो. खुडलेला बेल महादेवाच्या पिंडीवर आपोआप पडला, हा योगायोग. बाण सोडणाऱ्या व्याधाला हरीण दांपत्य म्हणते, ''आम्ही घरी जाऊन येतो. पाडसाचा निरोप घेतो.'' याला सत्याग्रहातली विधायक निर्भयता म्हणायचे. पाडसे व्याधापाशी येतात. त्याला विनंती करतात, ''आम्हाला मार.'' व्याधाचे मन दवते. तो धनुष्यबाणातली पापी वृत्ती मोडून काढतो. त्याच्या एकाग्र मनाला उपवासाचे श्रेय गवसते. जागरणाने मन पालटते. रात्रीतला अंधार अनायासे त्याच्याकडून तप करवून घेतो. शारीर भुकेतून मानस भूक, निसर्ग भूक, सांस्कृतिक भूक यांचा त्याला साक्षात्कार घडतो नि तो सगळ्यांच्या कल्याणासाठी झटतो. म्हणून तो शिवलोकात जातो.

जव्हार-डहाणूचा आदिवासी पट्टा महाशिवरात्रीस आपला उत्सव मानतो. ते शिवाला डोंगरदेव नि पृथ्वीला पार्वती मानतात. सातपुड्यात डोंगरदेवाची जत्रा अतिशय प्रसिद्ध आहे. या देवाला आपल्या गावाजवळच्या नदीच्या पाण्याची, तळ्यातल्या-विहिरीतल्या पाण्याची कावड वाहातात. 'हर हर महादेव'च्या उद्घोषात कावडी निघतात. साऱ्या आदिवासींना, वनवासींना महादेवाने वर दिला, ''मी सदैव पर्वतात, अरण्यात असेन, पार्वतीसह. तुमचा सांभाळ मी करीन.'' महाशिवरात्रीला आदिवासी नवी पालवी, नवा मोहर महादेवाला वाहातात. नवे कपडे घालून जत्रांना जातात. या आदिवासींमध्ये महादेवाच्या बाबतीत विविध कथा आढळतात. कथांतून निसर्ग आणि माणूस यांचे अतूट नाते सरसपणे व्यक्त होते. एक छान लोककथा मुद्दाम देतो. ही कथा पुन: पुन्हा वाचा. प्रत्येक वेळी ती नवा अर्थ देते.

शिवाला फळे आणायला पार्वतीने सांगितले. शिव अरण्यात गेला. शिवाच्या तेजाने फळे काही दिसेनात. शिवाने तिसरा डोळा उघडला. अरण्यात प्रकाशच प्रकाश झाला. वारा घाबरला. तो पळाला. झाडे हलायला लागली. फळे शंकराच्या समोर आली. शंकराने नंदीला फळे गोळा करायला सांगितले. नंदीने त्याप्रमाणे फळे पार्वतीच्या पुढ्यात ठेवली. पार्वती नंदीला म्हणाली, ''मी शिवाला फळे आणायला सांगितली. तू का आणलीस?'' नंदी म्हणाला, 'मला आज्ञा झाली. मी आणली.'' पार्वतीने विचारले, ''यातली महादेवाने कोणती फळे उचलली?'' नंदी चतुर. तो म्हणाला, ''मला देवाने आज्ञा केली. मी आणली.'' तेवढ्यात महादेव आले. व्याघ्रझोळीतून फळ काढले. पार्वतीच्या हातावर ठेवीत म्हणाले, ''हे घे.'' पार्वती खुलली. ''फळ आणायला एवढा वेळ लागला? कुणी भेटली होती की काय रस्त्यात?'' शिव हसला. म्हणाला, ''फळ मिळायला तप करावं लागतं. झाडांना त्रास न देता, त्यांच्या इच्छेनं फळ हातात पडायला सहनशीलता लागते. तुझ्या तपाचं हे फळ. अरण्याला त्रास न देता तप करायचं नि फळही त्याला विचारून खायचं.'' पार्वती म्हणाली, ''माझं चुकलं. मी फुलं उगाच तोडली.'' शिव म्हणाला, ''यापुढे लक्षात ठेव. पृथ्वीवर आपसूक फुलं पडली ती आपली. झाडावर असलेली ती अरण्याची.'' शिवाने पार्वतीला बेलफळ दिले. उमा बेलफळासह शिवात गुंगली.

या लोककथेने पर्यावरणाचा संदेश दिलाय. झाडांवरली फुले, फांद्या ताणून धसमुसळेपणे तोडायची नाहीत. काही आदिवासी स्त्रिया महाशिवरात्रीच्या दिवशी डोक्यात फुले खोवत नाहीत. मोकळ्या केसांनी शिवदर्शनास जातात. पांढरी फुले-बेल शिवाला वाहातात. शिव हा त्यांना आपला पालक वाटतो. संरक्षक वाटतो. काही आदिवासी अनवाणी दर्शनास येतात. जत्रेत मुलांना डमरू घेतात. कडेवर पोरांना घेऊन फेर धरून डोंगरदेवाची गाणी म्हणतात.