Wednesday, August 31, 2011

Monday, August 22, 2011

Aaj Fodayachi Dahi Handi...आज फोडायची दहीहंडी ...

Aaj Fodayachi Dahi Handi...आज फोडायची दहीहंडी ...

युगंधराचा पराभव


युगंधराचा पराभव

पाठशिवणीचा खेळ खेळून दमलेले बालगोपाळ
यमुनेकाठी डेरेदार वृक्षाखाली विसावले
नदीचे चमचमणारे प्रवाही पात्र
अलगद बाळकृष्णाला काळाच्या पुढे घेऊन गेले
शेवटी योगेश्वराची दृष्टी ती...
शतकांच्या, सहस्त्र्कांच्या आणि युगांच्या सीमा लांघून गेली...
आणि अचानक कुठेशी अडखळली...
...अरे हा कसला गोंगाट
हि कसली गर्दी?
आणि हे मधोमध कोण?
अरेच्चा, हे तर माझेच सवंगडी!
.... शेजारी हे कसले व्यासपीठ... नव्हे हा मंच,
हे कौरावांसारखे कोण? सोबत नर्तकांचा संच...
गिरीधर चक्रावला... क्षणभर कळेनासे झाले...
मग भगवंतानी दिव्यदृष्टी थोडी ताणली...
कालसंदर्भ लावून परिस्थिती जाणली...
.. हे तर माझेच अनुकरण...
आज गोकुळाष्टमी... म्हणजे माझेच स्मरण!
पण मी तर दही चोरून खायचो...
थोडा आई यशोदेला भ्यायचो..
हंडीपर्यंत पोचायला तीन थर पुरायचे
पोटभर खाऊनसुद्धा बोटभर उरायचे
... मात्र हे कसली लालसा? हि कुणाची हाव?
साहस कुणाचे... आणि कुणाचे आव?
हा तर याचा स्वार्थ... कुणाच्या प्रमोशनची वेळ,
माझ्या दिशाहीन गोपाळांच्या जीवाशी खेळ?!
... हा सुपरस्टार कधी चौथ्या थराला चढला?
तो अक्शन हिरो कधी पाचव्याहून खाली पडला?
मुरलीधर गलबलला... युगांपलीकडून एक आर्त आवाज आला...
"जे स्वत:च्या मनोधैर्याची उंची वाढवते ... ते साहस...,
जे स्वार्थांच्या हंड्यांची उंची वाढवते ... ते दु: साहस...
....कळेल तुम्हाला?"
... इतक्यात कसलासा जल्लोष झाला,
"वरचा कृष्ण" खाली आला...
एकच झिंग... सारे नाचू लागले...
कुणी मातीवर... कुणी चुकून... छातीवर...
केशवाची नजर चुकली... तो गोविंदा पुन्हा दिसला नाही...
नजरे आड गेला कसा, हरीचा विश्वास बसला नाही...
पुन्हा दिव्यदृष्टीला पुढे ढकलून...
मोहनाने त्या 'गोविंदाचे' घर गाठले... मात्र
आतल्या यशोदेचा टाहो ऐकून ईश्वराचे पाय
उंबरठ्याशी थिजले...
त्याच दिवशी गोकुळातले
आणखी काही दिवे विझले..
....
इथे पेंद्याने शून्यात नजर लावून बसलेल्या
बाळकृष्णाला हलवून विचारले,
"कन्हैय्या कुठे हरवला होतास?"
... पाणावलेल्या डोळ्यांनी भगवंत म्हणाले,
"हरवलो नव्हतो... मी "हरणार" आहे...
आपली खट्याळ खोड अक्षम्य गुन्हा ठरणार आहे.
.. चला गोरजवेळ झाली .. घरी जाऊ...
आणि उद्यापासून दही लोणी मागून खाऊ...

सौमित्र साळुंके

Wednesday, August 17, 2011

"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?





"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?

१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.

२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.

४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.

५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...

......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.

६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.

७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!

८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.

९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.

१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.

११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.

आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे... अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या!!!
  जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!

Tuesday, August 02, 2011