Wednesday, August 21, 2013

Tuesday, August 20, 2013

Narali Purnima... नारळी पूर्णिमा …

Narali Purnima... नारळी पूर्णिमा …

रक्षाबंधनाच्या 'गोडगोड' शुभेच्छा!

' तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना'
असं एक खास नातं म्हणजे बहिण-भावाचं नातं.
या नात्यात खोड्या असतात, रुसवे फुगवे
असतात, तर कधी हाणामारीपर्यंत मजल
गेली असते. पण ही झाली नाण्याची एक बाजू
दुसरीकडे आई-बाबा रागावल्यानंतर
आपल्या जवळचं वाटणारं, आपल्याला समजून
घेणारं, जनरेशन गॅपमध्ये आपल्या पाठीशी ठाम
उभं राहणारं नातं असतं तेही बहिण भावाचं.
सुखदु:खाच्या प्रसंगात सगळ्यात जवळचं नातं
म्हणजे बहिण भावाचं. अशा निखळ
आणि नि:स्वार्थ प्रेमाची,
संबंधाची परंपरा कायम जपणारा कौटुंबिक सण
म्हणजे 'रक्षाबंधन'.
लहानपणापासून असणा-या या सणाचा उत्साह
कितीही मोठे झालो तरी कायम असतो. पण
अनेकदा भाऊ-बहिण कामाच्या तणावात
आणि धकाधकीच्या जीवनात
रक्षाबंधनाची सुटी काढून एकमेकांकडे पोहचू
शकत नाही. किंवा काही जण एकमेकांपासून खूप
लांब राहातात. पण
आपल्याला आजच्या दिवशी एकमेकांची आठवण
विशेष करून येत असते. त्यांच्याशी खूप बोलावं,
आपलं मनं मोकळं करावं असं ही वाटत असतं.
अशा आपल्या भावा-बहिणींना
आपल्या शुभेच्छा आणि मनोगत
प्रतिक्रिया स्वरुपात इतर
वाचकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप आनंद
होईल.
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या 'गोडगोड'
शुभेच्छा!


Rakhshabandhan Shubhecha...

Rakhshabandhan Facebook Cover Photo

... रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा...

Rakhshabandhan... रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा...

रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

Monday, August 19, 2013

दुनियादारी

Maza avdta dilog dunyadari cha
दुनियादारीचा खास डायलाँग.
श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते
की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु
माझ्याबरोबर लग्न केलेस.
असे का केलेस तु.......?
. .
शिरिन ( सई) : मी विचार
केला की मी तुला काय देवू शकते तर
मला फक्त एकच उत्तर मिळाले
"मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते"...




प्रेम करणे सोपे नाही

प्रेम करणे सोपे नाही

Thursday, August 15, 2013

Wednesday, August 14, 2013

Jata Jata... जाता जाता ...

Jata Jata... जाता जाता ...

चुकलंच.... पण कुणाचं ??

चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,

मी तिला असं दुःखवायला नको होतं...



हां, झालं असेल काही उलटं सुलटं,

कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!

मी कधी याचा विचारच का केला नाही?

आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??



पण तरीही ती माझीच होती,

कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!

झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,

पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??



तिला काय वाटत असेल आत्ता?

जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?

शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,

मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?



मी काहीच बोललो नाही.

बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..

बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,

पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!



शेवटचा निर्णय तिचाच होता ,

त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,

दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...

मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!



की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...



......विभास

Wednesday, August 07, 2013

Shravan Aala... श्रावण आला !!

श्रावण आला !!
श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

Monday, August 05, 2013