Thursday, December 31, 2015

" सरणारे वर्ष मी "

" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही नका देऊ
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही नका येऊ

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणणार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

Wednesday, December 30, 2015

कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....!

प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच आणि आमचं अगदी सेम असतं
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे ,
फसल्या तर फसू दे .

तरीसुद्धा
तरीसुद्धा ,
प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
मराठीतून "इश" म्हणून
प्रेम करता येत ,
उर्दूमध्ये "इश्क़ " म्हणून
प्रेम करता येत .
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येत .
Convent मध्ये शिकलात तरी
प्रेम करता येत
सोळा वर्ष सरली कि अंगात फुल फुलू लागतात .
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलु लागतात .
आठवत ना ?
तू मची माझी सोळा जेव्हा
सरली होती ,
होडी सगळी पाण्याने
भरली होती ?
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो .
होडी सकट बुडता बुडता
वाचलो होतो .
बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं ,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं .
तूम्हाला ते कळल होतं .
मला सुद्धा कळलं होतं !
कारण ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
"प्रेमबीम झूठ असतं ",
म्हणणारी माणसं भेटतात .
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं,
म्हनणारी माणसं भेटतात !
असाच एक जन
चक्क मला म्हणाला ,
"आम्ही कधी बायकोला
फीरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधी सुद्धा केलं नाही !
आमचं काही नडला का ?
प्रेमाशिवाय अडला का ?
त्याला वाटलं मला पटल !
तेव्हा मी इतकाच म्हटलं :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं मात्र सेम नसतं.
तीच्यासोबत पावसात कधी
भीजला असाल जोडीने !
एक chocolate अर्ध अर्ध
खाल्ला असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासंतास फिरला असाल !
झंकारलेल्या सर्वस्वाने
तीच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यानीच हसणं असतं ,
प्रेम कधी भांडतं सुद्धा !!
दोन ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं ,
घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
-कविवर्य मंगेश पाडगावकर .
खुपच वाईट बातमी..! साहित्य जगतामधला महान तारा निखळला.....!
बाकीचे सगळे भास असतात,
सोबतीला अखेरपर्यंत
आपलेच फक्त श्वास असतात...!
कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....!

Wednesday, December 23, 2015

सुंदर खळी

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुंदर खळी
पडायची…
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजून सुंदर दिसायची…

Tuesday, December 22, 2015

मोबाईल शिवाय...

मोबाईल शिवाय...

बारा मोटेची विहीर

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!

Thursday, December 17, 2015

आज चंपा षष्ठी

आज चंपा षष्ठी
जय मल्हार

गड जेजुरी जेजुरी
तिथे नांदतो मल्हारी
स्वयं महादेव देव
मार्तंड भैरव अवतारी

गड जेजुरी जेजुरी
गडाला नवलाख पायरी
उधळण भंडा-याची
भक्त भक्ती भावे करी

गड जेजुरी जेजुरी
चमकते सुवर्णनगरी
जयाद्री सखी गौरीची
म्हाळसा बनली गौरी

गड जेजुरी जेजुरी
राजधानी मल्हारगडावरी
मणिमल्ल दैत्य माजले
रिपुदमन करी मल्हारी

प्राची देशपांडे

Monday, December 14, 2015

Mitra... मित्र


तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

-एक एकटा एकटाच

Tuesday, December 01, 2015

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर

Monday, November 30, 2015

भेट

भेट
वाटलं कधी भेटावसं
तर...
वाऱ्याची झुळूक होउन ये,
अलगद स्पर्शाने गोड
गालावरती चुंबन घे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पावसाची सर होउन ये
चिंब चिंब भिजवुनी
मिठितला आनंद दे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पाव्यातला सूर होउन ये
गोड गळयातील आवाजाने
हृदयाला तू साद दे...!!!
-मंजूळा हाडके

रंग पाण्याचे

मराठी भाषेची सुंदरता
👌
रंग पाण्याचे

'पाणी'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी'भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी'जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी'पाणी'काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी'पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे'पाणी'होते
ओंजळीतूनी 'पाणी'सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे'पाणी..पाणी'करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

खूपदा तुझ्या आठवणी

खूपदा तुझ्या आठवणी
पावलं न वाजवता येतात
आणि जाताना माझ्या मनाला
पावलं जोडून जातात
-चंद्रशेखर गोखले

Thursday, November 26, 2015

अमीर शाहरुख

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/

Tuesday, November 24, 2015

अश्रू

पापणी आड दडलेले अश्रू
टचकन गालावर ओघळले
ह्रुदयीचे दुःख तुझ्या
काळजावर माझ्या वार करून गेले
वाटल तुला घ्याव जवळ
गालावरचे अश्रु ओठानी चुंबावे
पण अस तुझ रूप हे
वाटे , तुझ्याकडे पहातच रहावे
गुलाबी गुलाबी गालावर
अश्रु तुझे चमकले
शेवटी न रहावुन मी तुला
अलगद मिठीत घेतले
थरथरणारे तन तुझे
माझ्या मिठीत खुलले
तुझ्या ओठावरचे स्मितहास्य
नयनानी माझ्या क्षणात टिपले
सौ मनिषा पटवर्धन

Monday, November 23, 2015

।। गोष्ट छोटी, डोंगराएवढी ।।
त्या राजाला विश्वास असतो आपल्या प्रजेच्या प्रामाणिकपणावर. एकदा एक साधू राजाकडे येतो. राजा साधूला प्रजेच्या प्रामाणिकपणाविषयी सांगतो. ‘तेवढाच गुण आता दुर्मिळ होत चाललाय. तुझ्या प्रजेचं अभिनंदन ! पण मी तुझ्या प्रजेची एक छोटी परीक्षा घेऊ इच्छितो’, साधू बोलला. नगरात दवंडी पिटली. ‘राजवाड्याशेजारच्या हौदात प्रत्येक नागरिकाने एक लोटा दूध रात्री आणून टाकायचं.’ प्रत्येकजण हातात लोटा घेऊन हौदात दूध टाकून येत होता. हौदाकडे जाणारा कुणी एक असा विचार करत होता की, ‘इतक्या लोकांच्या दुधात आपले एक लोटा पाणी कोणाच्याच काय, देवाच्यासुद्धा लक्षात येणार नाही.’
सकाळी हौद उघडला. राजा हैराण झाला. हौदात फक्त पाणी होते. साधू महाराज अर्थपूर्ण हसले. नंतर राजा साधूसह राजवाड्यात निघाला. रस्त्यावर त्यांना एक गोड मुलगा हातात लोटा घेऊन हौदाकडे घाईघाईने जाताना दिसला. राजाने विचारल्यावर त्या मुलाने सांगितले, ‘झोपल्यामुळे रात्री हौदात माझे दूध टाकायचे राहून गेले. ते टाकायला जातोय.’ राजाने पाहिलं, तर खरंच त्या मुलाच्या लोट्यात दूध होतं.
‘मोठ्या लोकांना प्रामाणिकपणा ‘दाखवता’ येतो. काहींमध्ये तो असला तरी सर्वांत असेलच असं नाही. राजा, रात्री प्रत्येक माणूस लोटा झाकून नेत होता. रात्री तर अंधार होता ना? प्रामाणिक असणं या निरागस बाळासारखं उघड असतं. अशी मुलं आहेत, तोपर्यंत हे जग छान असेल. अशा मुलांना जप. त्यांच्यासाठी काही कर’, असं सांगून साधू निघून गेला.
गोष्टीतली ही मुलं खरी असतात का? परवा मी वरच्या गोष्टीतला मुलगा पाहिला. राज दत्तात्रय देसले असं त्याचं नाव. दुसरी-तिसरीत असावा. मी मनाने त्याला नमस्कार केला. तो कुणाला दिसणार नव्हता. निरपेक्ष कर्मयोगाची एक नाजूक कळी मला त्या मुलात दिसली. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, म्हणतात ना, अगदी असंच काहीतरी मी त्या बाळात पाहिलं. शाळा सुटली.
मुलं गलका करत घराच्या ओढीने शाळेच्या आवाराबाहेर पडत होती. त्यात हा राजही होता. पाठीला दप्तर, हातात पाण्याची बाटली. आमच्या शाळेच्या व्हरांड्यावरून मी ती मुलं पाहत होतो. राजने लक्ष वेधलं. त्याच्या हातातल्या बाटलीत बरंच पाणी उरलं होतं. वाकून तो ते पाणी सांडत होता. माझ्या शाळेतील पर्यावरणाचे शिक्षक मनोहर देसाई, मधू भांडारकर आम्ही जिज्ञासा म्हणून राजने जिथं वाकून पाणी टाकलं, तिथं पाहिलं, तर तिथे एक छोटं रोप लावलं होतं. त्या रोपाला राजने पाणी घातलं होतं. पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या राजचं मला कौतुक वाटलं.
गोष्टीतल्या ‘त्या’ मुलाच्या आणि सत्यातल्या या ‘राज’सारख्या मुलांच्या माणूसपणाच्या रोपाला इथली कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवस्था आस्थेचं, प्रेमाचं आणि प्रेरणेचं पुरेसं पाणी घालू शकली तर या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरजच काय?
...कमलाकर देसले (मटा. ०५ मार्च २०१३)

Friday, November 20, 2015

एकदा मला ना

एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय
-चंद्रशेखर गोखले

Thursday, November 19, 2015

मी माझी रे! उरले नाही

मी माझी रे! उरले नाही

खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 18, 2015

मी कधी कधी

मी कधी कधी

मी कधी कधी
होतो खूप उदास
नसतो कधी जेव्हां
तुझा सहवास

मी कधी कधी
असतो खूप आनंदात
तू असलीस बरोबर की
साखर पडते दुधात

मी कधी कधी
होतो अस्वस्थ फार
उद्या संध्याकाळपर्यंत
तू नाही दिसणार

मी कधी कधी
विचारतो मनाला
अर्थ काय तुझ्याशिवाय
माझ्या जीवनाला ?

मी कधी कधी
होतो कासावीस
माझ्याशिवाय तू
रहात कशी असावीस ?

मी कधी कधी
ठेवतो मनाला सांगून
तू माझी झाली नाहीस
तर काय करू जगून

~अजित

माझे खुलेपण

माझे खुलेपण

Friday, November 13, 2015

किती सांगायचं मला

किती सांगायचं मला

बहीण: एक अनोखं नातं

बहीण: एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या

किती सांगायचं मला….

किती सांगायचं मला….

Wednesday, November 11, 2015

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं,
तू खूपसं दिलंस तरी
आणखीन मागायचं होतं..
चंद्रशेखरजी गोखले

लक्ष्मी पूजन

समृद्धी यावी सोनपावली,
उधळण व्हावी सौख्याची,
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची,
इंद्रधनुष्याचे रंग खुलावे,
शुभेच्छा ही दिपावलीची.
सर्व नागरिकांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा

Monday, November 09, 2015

गारवा

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री अंबासकर

Saturday, November 07, 2015

वसुबारस

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

Friday, November 06, 2015

आठवणी

आठवणी

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

~(आठवणीत हरवून गेलेला) अथांग सागर

Wednesday, November 04, 2015

तुझी गहरी नजर

तुझ्याकडे येणारं
एक एक पाउल
मी खूप आशेने टाकायचो ...
तू गहिऱ्या नजरेने
बघायचीस मला
अन मी तिथेच
खिळून राहायचो ...

Tuesday, November 03, 2015

पुन्हा तुझ्या स्पर्शाचा तो कोवळा भास..

पुन्हा तुझ्या स्पर्शाचा
तो कोवळा भास
आणि क्षणात मी करून येते
काही वर्षांचा प्रवास...
~ चंद्रशेखर गोखले


Wednesday, October 28, 2015

तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या गालावरच्या खळीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले

सौ मनिषा पटवर्धन

ती म्हणजे मैञी असते...

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला
हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते...

Monday, October 26, 2015

अशी सावळी आहेस

अशी सावळी आहेस

हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस

सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस

गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस

स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस

तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस

~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Thursday, October 22, 2015

जेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन

नेमकं तेंव्हाच वळून बघू नकोस
जेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन
मला वाटतं तेंव्हा मी...
अगदी खुळ्यासारखा दिसत असेन...
~ चंद्रशेखर गोखले

Monday, October 19, 2015

साडीचा "पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे

Friday, October 16, 2015

नवरे...



(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.

आदर्श नवरा दाखवा ,

हजार रुपये मिळवा

खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...
तीर्थ करूं जाता म्हणती कावळा, न करिता त्याला म्हणती बावळा
फार खाय त्याला म्हणती अघोरी, राक्षस हा असे खादाड भारी
थोडे खाय त्याची करिती टवाळी, अन्न कैसे पाप्याच्या कपाळी
तुका म्हणे किती राखावी मर्जी, संसाराचे त्रास घेता.

बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीनधांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वीनिर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचासूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही ,त्याला टीकाकार म्हणतात.

नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''
हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , 'स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं! ''

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.

एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीचमेषपात्र आहे. ''
आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''
एक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , ''आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''

हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''
माझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.

नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर ,पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते ,तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''

तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा.''
आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.

सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.
एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''

नवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.

सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.

स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.
बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे, अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.
कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''

गुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात, पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.

नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात ,तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?'' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...

... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.
- शरद उपाध्ये

Wednesday, October 14, 2015

नवरात्र.... रंग

नवरात्र....

एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!

Tuesday, October 13, 2015

नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 || सर्व मंगल मांगल्ये ,शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

नवरात्र महोत्सव मधील येणाऱ्या ९ दिवसात तुमचे सर्व मनोरथ,संकल्प पूर्ण व्हावेत तसेच नेहमी आरोग्य उत्तम राहून आपणास ऊदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो.

Friday, October 09, 2015

Wednesday, October 07, 2015

गप्पच राहवसं वाटतं
तुझ्याजवळ बसल्यावर
वाटतं तुच सगळं ओळखावस
मी गालात हसल्यावर....
-चंद्रशेखर गोखले

श्राद्ध

श्राद्ध

सुविचार

सुविचार
औदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे
तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं …

Monday, October 05, 2015

एक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)



एक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)
एक तारा लुकलुकणारा
आणि वारा दरवळणारा
खिडकीत जरा येऊन बघ
तारा माझा भास देईल
वारा तुझा श्वास होईल
स्वत:मध्ये हरवून बघ
मन मनात गाणं गाईल
चेहऱ्यावरती हसू येईल
हसता हसता लाजून बघ
वारा खिडकीशी रेंगाळेल
तारा तुझ्यावरती भाळेल
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हणून बघ....!!
....रसप....

आजीबाईचा बटवा

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||